फराह्बक्ष महाल / Farah Baksh Mahal





फराह्बक्ष महाल:-




अहमदनगर मधील हवामान उष्ण आणि कोरडे आहे.निजामशाहीच्या काळात उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून उद्यानात जल महाल बांधण्यात आले. चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी असलेल्या फरह बक्ष महालाची गुलाबी, अष्टकोनी वस्तू पाहून शहाजहान ला आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्युनंतर ताजमहालाची कल्पना सुचली असे म्हणतात. हा महाल सन १५७६ ते १५८३ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.





मुर्तझा निजामाशाहाला त्याने महाल बांधण्यास सांगितले.नंतर सालाबत खान (दुसरा) याने हे काम पूर्ण केले.घुमत, उंच कमानी व मोठी गवाक्षे असलेल्या या इराणी वास्तुशैलीच्या दुमजली महालाच्या मध्यभागी रंगमहाल आहे.तिथे नृत्य गाणी चालत.तेथे कारंजी असून त्यासाठी खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते.बादशाह आपल्या राजस्त्रिया व पाहुण्यांसह येथे मौजमजेसाठी येत. अकबराचा सेनापती खान खनान याने नगरवर स्वारी करण्यासाठी आला तेव्हा येथेच मुक्काम केला होता. लढाईला जाताना सदाशिव पेशवे यांनी सुद्धा येथे मुक्काम केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post