अहमदनगरचा किल्ला / Ahmednagaar Fort





अहमदनगरचा किल्ला :-




निजामशाहीची राजधानी अहमदनगर होती.१४९० मध्ये बहामानीचा सेनापती जहांगीर खान याच्याशी झालेल्या लढाईत मधील विजयाच्या प्रीत्यर्थ निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने ‘कोट बाग निजाम’ नावाचा महाल स्वतः साठी बांधला.येथूनच किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली.हुसेन निजामशाह या अह्मद्शाहाच्या नातुने पुढे शत्रूच्या आक्रमणाची शक्यता लक्षात घेवून २२ बुरुज असलेला मजबूत कोट निर्माण केला.







१ मैल ८० यार्ड परीघ आणि तटबंदी भोवती रुंद खंदक असल्याने हा किल्ला अभेद्य बनला होता. किल्ल्यात सोनमहाल, गगनमहाल,मिनामहाल बगदाद महाल, मुल्क आबाद, दिल काषद हे महाल होते. १९४२ च्या आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू सह १२ नेत्यांना किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. निजामशहाच्या महालाचे अवशेष आजही किल्ल्यात पाहायला आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post